शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

कारागीर विद्यापीठ शासनमान्यतेसाठी प्रयत्न - सुरेश हाळवणकर : सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:31 IST

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले.

ठळक मुद्देकारागिरांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपºयांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे हा कारागीर महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री विश्वकर्मा कारागीर नगरीतील या कार्यक्रमास राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, बेळगांवच्या मितान फौंडेशनचे गोपीकृष्णन, कोल्हापूर विभागाचे माहिती संचालक सतीश लळीत, प्रमुख उपस्थित होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, सिद्धगिरी महासंस्थानचे काम भव्य-दिव्य आहे. हजारो वर्षांची कारागीर, कलांच्या जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून पडले आहे. देशभरातील विश्वकर्मांना एकत्रित करून राबविलेला हा उपक्रम श्रमशक्तीचा महाकुंभ ठरला. सिद्धगिरी कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सिद्धगिरीवरील ‘लखपती शेती’चे तंत्रज्ञान देशभरात जाण्याची गरज आहे. त्यासह येथील गुरुकुल शिक्षणपद्धती ही देश बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा गुरुकुल पद्धतीवरील शाळा शासनाने सुरू कराव्यात.

या कार्यक्रमात महाकुंभातील सहभागी कारागीरांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कारागीरांना ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बसंतकुमार सिंग, योगीप्रभू, रामबाबू, सुरेश पाटील, नाना पठारे, हिंदुराव शेळके, प्रताप कोंडेकर, आर. डी. शिंदे, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.महाकुंभाला आठ लाख लोकांची भेटया महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यांतील १२० कारागीर सहभागी झाले. त्यांच्या माध्यमातून पाचशे कला, कारागिरीचे दर्शन घडले. दोनशेहून अधिक गायी, बैलजोड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाकुंभाला पाच दिवसांत सुमारे आठ लाख लोकांनी भेट दिली. शंभर साधू-संत सिद्धगिरी मठावर आले. दरवर्षी कारागीर महाकुंभ भरविण्याचा विचार सिद्धगिरी महासंस्थान करत असल्याचे अमित हुक्केरीकर यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांना ‘पॉलीहाऊस’द्वारे मदतीचा हातसेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून रोजगार निर्मितीसाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे मदतीचा हात दिला जात आहे. शेतकऱ्यांना चौदा पॉलीहाऊस बांधून दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकºयांची स्वत: जमीन आणि पाणी, विजेची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

या पॉलीहाऊसमध्ये उत्पादित होणारा सेंद्रिय भाजीपाल्याला बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या शेतकºयांना पॉलीहाऊस बांधून दिले आहे. त्यांनी पॉलीहाऊस बांधणीतील निम्मा खर्च परत करावयाचा आहे. शेतकऱ्यांकडून परत येणाऱ्या पैशांतून अन्य शेतकऱ्यांना पॉलीहाऊस बांधून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.च्त्यातील पहिल्या पॉलीहाऊसची किल्ली कणेरी (ता. करवीर) येथील मनीषा पाटील यांना आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सिद्धगिरी हॉस्पिटल येथे लवकरच कार्डियॉक सेंटर सुरू केले जाणार आहे.